Sunday, 16 September 2012


कायम आठवणीत राहणारी बर्फी 
आज काल तरुणांना प्रेम म्हणजे लेमन गोळी सारखे वाटते तोंडात टाकले कि विरघळले, एक संपली कि लगेच दुसरी मग तिसरी....शेवटी तोंड कडू झाल्या शिवाय राहत नाही...  मग सर्वच म्हणतात प्रेम म्हणजे फालतू चा टाईमपास. अश्या लोकांनी 'बर्फी' नक्कीच पाहावा. निरागसता, निस्वार्थीपणा,   विश्वास , भावना, इच्छा आणि मागे न हटण्याची वृत्ती. ह्या सगळ्या प्रेमाच्य चवी तुम्हाला बर्फी मध्ये नक्की सापडतील. शिवाय जुन्या चुका कुठे कुठे झाल्या हे पण समजेल. असं म्हणतात कि प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात सोन पावलांनी येते...वाट पहा नक्की येईल....

No comments:

Post a Comment